-->
माती हा शेतीतील अत्यंत महत्वाचा घटक, याकडे शेतकऱ्यांनी काळजीपूर्वक लक्ष द्या - सुमित रासकर

माती हा शेतीतील अत्यंत महत्वाचा घटक, याकडे शेतकऱ्यांनी काळजीपूर्वक लक्ष द्या - सुमित रासकर

बारामती- माती हा शेतीतील अत्यंत महत्वाचा घटक असून पिकांच्या अन्नद्रव्यांचा प्रमुख स्त्रोत आहे. या घटकाकडे शेतकऱ्यांनी काळजीपूर्वक लक्ष दिले पाहिजे. यालाच अनुसरून महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत रत्नाई कृषी महाविद्यालय अकलूज संचलित ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रम 2021-22 चे आयोजन शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज चे अध्यक्ष जयसिंह मोहिते- पाटील, महाविद्यालयाचे समन्वयक डॉ. डी.पी. कोरटकर, प्राचार्य आर.जी.नलावडे, प्रा. एस.एम. एकतपुरे, प्रा. एस.आर.आडत, प्रा. डी.एस. मेटकरी यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिदूत सुमित रासकर यांनी कण्हेरी ता. बारामती येथील शेतकऱ्यांना माती परीक्षणाचा विषयी माहिती दिली. यादरम्यान माहिती देताना कृषिदूत सुमित रासकर यांनी सांगितले की प्रत्येक शेतकऱ्याने किमान दोन वर्षातून एकदा तरी मातीचे आरोग्य तपासले पाहिजे. तसेच मातीमध्ये रासायनिक खतांचा अतिरिक्त वापर टाळावा असे आवाहन केले. यावेळी नितीन बनसोडे, मधुकर वाघ, नामदेव काटे, प्रवीण शिंदे, तुषार वाघ, नितिन देवकाते, अभिषेक रासकर, सिद्धांत रासकर आदी शेतकरी उपस्थित होते.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article