
"माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत बारामती नगरपरिषदेद्वारे आयोजित हरित शपथ कार्यक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद"
Sunday, January 3, 2021
Edit
बारामती - स्वच्छ भारत अभियान अंतर्गत केंद्र शासनामार्फत संपूर्ण देशात स्वच्छ सर्वेक्षण - २०२१ कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाद्वारे संपूर्ण राज्यात माझी वसुंधरा अभियानाची दिनांक २ ऑक्टोबर २०२० पासून सुरुवात झाली आहे .सदरहू अभियान अंतर्गत बारामती नगरपरिषदेने सहभाग घेतलेला आहे.
त्यामध्ये पृथ्वी, वायू, जल अग्नी आणि आकाश या पंचतत्त्वावर आधारित कामगिरीवर शहराचे मूल्यांकन होणार आहे.अभियानामध्ये अंतर्भुत घटकांसाठी वेळोवेळी विविध उपक्रम राबविले जातात. पर्यावरण विभागाकडील प्राप्त सूचनांनुसार शहरातील नागरिकांच्या वर्तनात बदल घडवून आणण्याकरिता आणि वसुंधरेच्या प्रति आपली जबाबदारी म्हणून शहरातील प्रत्येक नागरिकांनी आपला सहभाग नोंदवावा म्हणून शुक्रवार दिनांक १ जानेवारी २०२१ रोजी शहरामध्ये विविध ठिकाणी हरीतशपथेचे आयोजन करणेत आले होते. त्याअंतर्गत नगरपालिका कार्यालयामध्ये सकाळी ठीक ११ वाजता मा. नगराध्यक्षा यांचे प्रमुख उपस्थितीत सर्व कर्मचारीवृंद यांना हरित शपथ ( EARTH PLEDGE ) देण्यात आली. त्याचप्रकारे सराफ होंडा शोरूम पाठीमागे मा.नगराध्यक्षा सौ.पौर्णिमा तावरे यांचे प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण करून हरित शपथ घेण्यात आली.
यावेळी श्री.हनुमंत पाटील साहेब, श्री.सचिन सातव, श्री. बाळासाहेब जाधव, श्री. दीपक मलगुंडे, सहायक पोलीस निरीक्षक वाघमारे साहेब, विविध बँकांचे अधिकारीवर्ग आदी मान्यवर उपस्थित होते त्याचप्रमाणे नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी शहरातील बँका, शाळा, कंपन्या अशा विविध ठिकाणी जाऊन अभियानाविषयी जनजागृती करून हरितशपथ घेतली. अशाप्रकारे सर्व माध्यमातून मिळून सुमारे ८०० नागरिक व विद्यार्थ्यांनी हरिशपथ घेतली.
कॅनरा बैंक ऍक्सिस बँक, बैंक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बैंक, छत्रपती शाहू हायस्कूल, एकता इंग्लिश मेडीयम स्कूल, मएसो गजानन देशपांडे हायस्कूल, बानपाच्या सर्व १ ते ८ नंबर शाळा, जळोची जिल्हा परिषद शाळा, शारदाबाई पवार विद्या मंदिर शारदानगर आदी बँका, कंपन्या आणि शाळांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला. त्यापैकी बयाच शाळांनी ऑनलाईन हरीतशपथचे देखील आयोजन केले होते.
याप्रसंगी विजय शितोळे, अक्षय नाईक, सुभाष नारखेडे, विजय सूर्यवंशी, स्नेहल घाडगे, प्राजक्ता शिंगाडे आदी नगरपालिकेचा अधिकारी वर्ग आणि सर्व आरोग्य, स्वछता व उद्यान विभागाचा कर्मचारीवर्ग यांचा सहभाग व सहकार्य लाभले. त्याचप्रमाणे नगरपरिषदेद्वारे देखील केबल टीव्ही मार्फत शहरात ११ वाजता शहरातील नागरिकांसाठी हरीतशपथेचे आयोजन केले होते. त्यासदेखील नागरिकांनी भरभरून प्रतिसाद देत हरीतशपथ घेतली.
याप्रसंगी मा नगराध्यक्षा पोर्णिमाताई तावरे यांनी समाजाप्रती आपली बांधिलकी म्हणून पर्यावरण रक्षक म्हणून काम करण्याचे आवाहन केले व सर्व नागरिकांचे उत्स्फूर्त सहभागाबद्दल आभार मानले .