-->
१५ मे पर्यंत लॉकडाऊन वाढणार? आपत्ती व्यवस्थापन विभागाचा मुख्यमंत्र्यांना प्रस्ताव

१५ मे पर्यंत लॉकडाऊन वाढणार? आपत्ती व्यवस्थापन विभागाचा मुख्यमंत्र्यांना प्रस्ताव

कोऱ्हाळे बु : “ब्रेक द चेन’नंतर मागील १२ दिवसांत राज्यात ६५ हजारांच्या सरासरीने सात लाख चार हजार रुग्ण वाढले आहेत. कोरोनाची साखळी खंडित होण्यासाठी १५ मेपर्यंत निर्बंध कायम ठेवावेत, असा प्रस्ताव आपत्ती व्यवस्थापन विभागाने तयार केला आहे. तो प्रस्ताव २९ एप्रिलपर्यंत राज्याचा पुन्हा एकदा जिल्हानिहाय आढावा घेऊन मुख्यमंत्र्यांना पाठविला जाणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री त्यावर निर्णय घेतील, अशी माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली.
       अंतर्गत राज्यात १ मेच्या सकाळी सात वाजेपर्यंत कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दरम्यान, कोरोनाची साखळी खंडित करण्याच्या हेतूने जिल्हाबंदीही लागू करण्यात आली आहे. तरीही मुंबई, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा, जळगाव, बीड, लातूर, यवतमाळ, नांदेड यासह अन्य शहरे व ग्रामीण भागात नियमांचे पालन तंतोतंत न करणाऱ्यांची संख्याही लक्षणीय आहे.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article