-->
तालुक्याच्या ग्रामीण भागात पाऊसाने घातले थैमान

तालुक्याच्या ग्रामीण भागात पाऊसाने घातले थैमान

वाकी ता. बारामती येथे काल आणि मंगळवारी झालेल्या वादळी पावसामुळे ओढ्याने रौद्ररूप धारण केले. यंदाच्या पावसाळ्यात सर्वाधिक पाऊस या दोन दिवसात पडल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर वडगाव निंबाळकर मध्ये शंभरच्या वर घरातून पाणी गेल्याने नुकसान झाले आहे. 



               वडगाव निंबाळकर येथील ओढयातील जलपर्णीचा फटका ग्रामस्थांना बसला आहे. काही महिन्यांपूर्वीच ओढ्यातील जलपर्णी काढण्यासाठी ग्रामपंचायतीने 2 लाख रुपये खर्च केला होता. मात्र पुन्हा जलपर्णी वाढल्याने काल झालेल्या मुसळधार पावसाने वाहून आलेली जलपर्णी पुलाला अडकून पाणी तुंबले आणि जवळपास १०० च्यावर घरे पाण्याखाली गेली. ग्रामपंचायत मध्ये सुद्धा पाणी घुसले होते. ग्रामपंचायत प्रशासन आणि ग्रामस्थांनी जेसीबी च्या सहाययने जलपर्णी हटवल्या नंतर पाणी ओसरू लागले. 


                वाकी येथे ओढ्यावर पुल आहे. याची उंची लहान असल्याने पावसाळ्यात ओढ्याला पाणी आले की हा पुल पाण्याखाली जात असतो. येथील पांढरवस्ती आणि चोपडज तसेच लोनीभापकर या गावाकडे जाणारा रस्ता सद्या ओढ्याला पुर आल्याने बंद झाला आहे. वाकी येथील शेतात पाणी शिरल्याने पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे




               पाणी अडवण्यासाठी बंधारे बांधण्यात आले होते. त्या बांधण्यात आलेल्या बांधाऱ्या च्या बाजूने माती वाहून गेल्याने बांधा - या मुळे साठणारे पाणी वाहूनजाणार असल्याचे वाकी येथील किशोर ननवरे यांनी सांगितले.


Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article