
दिलासादायक : वीर धरणात ५६% पाणीसाठा, पहा निरा खोऱ्यातील धरणांची स्थिती
Monday, May 17, 2021
Edit
कोऱ्हाळे बु- सध्या निरा नदीच्या खोऱ्यातील धरण क्षेत्रात पाणीसाठा समाधानकारक आहे.
उन्हाळी हंगामात अविरत आवर्तन सुरू आहे. यामुळे पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. पुणे आणी सातारा जिल्ह्याच्या हद्दीवर असलेल्या वीर धरणांमध्ये ५.७ टीएमसी ५६% पाणीसाठा आहे. उजव्या कालव्यातून १५५० क्यूसेक पाणी सोडण्यात आले आहे. पाऊस जास्त झाल्यामुळे धरणातून सोडण्यात येणारे रब्बी हंगामाचे आवर्तन उशिरा सोडण्यात आले होते. त्यामुळे पाणीसाठा दीर्घ काळ टिकला. वीर धरणात सध्या ५६% उपयुक्त पाणीसाठा आहे. धरणाची पाणीपातळी टिकवून ठेवण्यात येत आहे. जून महिन्यापर्यंत हे आवर्तन सुरू राहणार आहे.
निरा खोऱ्यातील पाणीसाठा खालीलप्रमाणे
भाटघर - ५.५ टीएमसी २२.४४%
गुंजवणी - १.७५ टीएमसी ४७.३४%
निरा-देवघर - २.६ टीएमसी २१%
वीर - ५.७ टीएमसी ५६%